Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबईत बुधवारी मध्यरात्रीनंतर वातावरणात बदल होऊन पहाटे १ ते २ दरम्यान पावसाची रिमझिम झाली. प्रचंड कडकडाट आणि विजांच्या गडागडाटासह मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या. यात पश्चिम उपनगरात पावसाची नोंद झाली. त्यानुसार बोरिवली १९ मिमी, जोगेश्वरी १७ मिमी, मरोळ १४ मिमी तर कांदिवली १२ मिमी अशी पावसाची नोंद झाली. मात्र गुरुवारी सकाळी लख्ख ऊन पडून दिवसाची सुरुवात झाली.